प्रकरण २ रे �छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवाजी विनायकास पत्र
या कालखंडातील दुसरा गद्य लेखनप्रकार म्हणजे अस्सल ऐतिहासिक पत्र व्यवहार होय. शिवकालीन राजव्यवहारासाठी कोणत्या प्रकाराची भाषा उपयोजिली जात होती, हे प्रामुख्याने पाहता येते.
आजचा औपचारिक राजकीय,शासकीय पत्रव्यवहार व त्याची भाषा आणि शिवकालीन पत्रव्यवहाराची भाषा यांतील साम्य व फरक विद्यार्थ्यांना अभ्यासता यावा म्हणून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवाजी विनायकास पत्र’ हे पत्रच पाठयघटक म्हणून निवडले आहे.
या पत्रात प्राकृत (मराठी) बरोबरच अरबी, फारशी या भाषांतील अनेक शब्द सहजपणे आले आहेत. या उताऱ्यातील भाषिक संरचना ही मराठी असली तरी अरबी,फारशी या भाषांतील अनेक शब्दांचा सर्वत्र वावर तसेच या शब्दांचे लक्षणीय प्राबल्य दिसून येते.
हे प्रमाण ढोबळमानाने चाळीस टक्के मराठी व वीस टक्के संस्कृत आणि चाळीस टक्के अरबी व फारशी असे आहे.
परकीय राज्यकर्त्यांच्या तसेच त्यांच्या भाषा व संस्कृतीचा,
राज्यव्यवहाराचा आपल्याकडील भाषा, संस्कृती व जीवनमानावर कसा
प्रभाव पडला,याचे निदर्शक हे पत्र आहे; मात्र पत्रलेखकाचा स्वभाव,
त्याची शिस्त, काटेकोरपणा, निर्भीडपणा, स्पष्टता आणि
नि :पक्षपातीपणा हे गुण या पत्रातून प्रतीत होतात.
छ.शिवाजी महाराजांच्या स्वभाव दर्शनासाठी व त्यांच्या राजकीय
व्यवहाराच्या अभ्यासासाठी, रयतेसंबंधीची त्यांची आस्था, आपुलकी
लक्षात यावी यासाठी हे पत्र अतिशय महत्वाचे आहे.
इतिहास :-�
जंजीऱ्याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले.
तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.सिद्दी हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली.
रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे.
किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात. या मुरुड गावाजवळ जंजिरा,सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत. जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला मात्र इतिहासाची पाने चाळल्यावर हे स्वप्न अधुरेच राहिले म्हणायला हवे.�
मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे.या ठिकाणाहून या किल्यात बोटीने जाता येते. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते.
कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट.
पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो.
मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे.�पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना वापरलेला आहे.
गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष पहायला मिळतात.�
दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत. या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्याच्या मार्याने झिजलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.�काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे.तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.�
गृहपाठ
‘शिवाजी महाराजांचे जिवाजी विनायकास पत्र’ या प्रकरणातून
शिवाजी महाराजांचे कोणते गुणविशेष दिसून येतात ते स्पष्ट
करा.