प्र. 9 ते 11 साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचीउत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
महात्मा बसवेश्वर मंगळवेढा राज्याचे महामंत्री होते. त्या नगरीत रामण्णा नावाचा एक अल्पभूधारक शेतकरी राहत होता. त्यावर्षी दुष्काळामुळे काहीच पिकलं नव्हतं. रामण्णाची बायका पोर दोन दिवस उपाशी होती. रामण्णा महालासमोरून जाताना राजवाड्यातील नीलांबिका बाईसाहेबांच्या अंगावरील चकाकणारे दागिने पाहिले. उपाशी कुटुंब त्यांच्या डोळ्यांसमोर आले. त्याने महालात चोरी करण्याचे ठरवले. चोरी केली पण पकडली गेली.महामंत्र्यांच्यासमोर हजर केल्यानंतर रामण्णांने चोरीचे कारण सांगितले. त्याची हकीकत ऐकल्यावर त्याला अभय दिले. त्यांनी इतर मंत्र्यांना सांगितले की प्रजेला किमान दोन वेळेचे भोजन मिळाले पाहिजे. प्रजेला जगवणे हे आपले कर्तव्य आहे. गरिबी व भूक याने त्रस्त रामण्णाला हे दागिने दिसले व त्याच्या मनात चोरीचा मोह निर्माण झाला. पत्नीस सांगितले की, आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे आपणच गुन्हेगार आहोत. लोभौवृत्तीमुळे कुणाचे ना कुणाचे शोषण होत असते. अतिसंग्रह पाप आहे म्हणून तुझ्या अंगावरचे दागिने देऊन टाक. दागिने दिल्यावर रामण्णाला बसवेश्वरांनी सल्ला दिला की, सकाळ-संध्याकाळ पाच-सहा तास शिवलिंगाची पूजा करण्यात शिवमंदिरात वेळ घालवण्यापेक्षा या दागिन्यातून एक बैल घे. तुझ्या शेतात कष्ट कर. तीच खरी देवपूजा आहे.